Skip to main content

मुळात आरक्षण का दिले जाते हेच नीट अभ्यासत नाहीत

आरक्षण या विषयासंदर्भात आपल्या देशात भयंकर संभ्रम आहे,किंबहुना तसा तो मुद्दाम निर्माण केला गेलाय.जातींना आरक्षण न देता आर्थिक निकषावर आरक्षण द्या असा आग्रह धरणारे मुळात आरक्षण का दिले जाते हेच नीट अभ्यासत नाहीत.आपल्या जातीने हजारो वर्षे अमर्याद आरक्षण उपभोगले आणि आज ज्यांना केवळ मागील साठ वर्षे आरक्षण आहे त्या जातींना शिक्षण-नोकरीवर बंधने घातली संपत्ती साठविणे जमीन बाळगणे घर बांधणे चांगले कपडे घालणे यावरही बंधने घातली त्यांच्या सावलीचाही विटाळ बाळगला अशा समूहांना सर्व समाजाबरोबर मुख्यप्रवाहात आनण्यासाठी आरक्षणाची तरतूद करावी लागली.हे आताच्या पिढीला माहित नाही किंवा माहित आहे तरीही हे कालचे गुलाम आज आमच्याबरोबरीने नको अशी सामंतवादी सरंजामी मानसिकता बळावत चालली आहे.यातूनच देशात जातदांडगा-धनदांडगा समाज आरक्षणाचा विरोध करतो ते बंद होत नाही म्हणून आम्हालाही द्या म्हणतो.
आरक्षणामुळे भेदभाव होत नसून समाजात जाती-पाती आहेत म्हणून भेदभाव होतो तो रोखण्यासाठी आरक्षण देण्यात आलेलं आहे.आरक्षणाचा भेदभाव अमान्य असतो जाती-पातीचा भेदभाव मात्र कौतुकास पात्र असतो काय? आरक्षणामुळे सामाजिक दर्जा सुधारण्याची अपेक्षा आहे आर्थिक नव्हे हि बाब लक्षात घेतली पाहिजे.त्यामुळे आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम असू शकत नाही हे स्पष्ट आहे.
याच अनुषंगाने जेव्हा आपण सर्वांना आर्थिक निकषावर आरक्षण द्या असे म्हणतो तेव्हा पुन्हा भेदभाव करण्याची संधी उपलब्ध करून द्या असा आग्रह करत असतो हे लक्षात घेतले पाहिजे.
असेही या देशात आरक्षण नसलेले लोकही वेगळ्या पद्धतीने अघोषित अमर्याद आरक्षणाचा उपभोग घेतच आहेत.

Comments

Popular posts from this blog

महार कोण होते?

महार कोण होते?  वेशीबाहेर राहून गावाचं रक्षण करणारा, शेती, गावांच्या सीमा सांगणारा, व्यापार्यांना संरक्षण पुरवणारा, शेतसारा आणि राज्याचा खजिना नियोजित ठिकाणी सुरक्षित पोहोचवणारा, असा समाजाचा रक्षक म्हणजे महार समाज. पण कामाच्या स्वरूपामुळं त्यांना वेशीबाहेरच ठेवण्यात आलं… महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हणजे काय हे समजावून घ्यायला पाहिजे. जे सध्या माहित आहे ते असेः 1. महार समाजाचे वास्तव्य गावकुसाबाहेर होते. 2. महार समाज ग्रामरक्षणाचे कार्य करत होता. वेशीचे रक्षण हे त्याचे नुसते कर्तव्यच नव्हे तर जबाबदारी होती. चोर नाही सापडला तर चोरीची भरपाई महारांनाच द्यावी लागत असे. 3. चोरांचा माग काढणे, गावात येणार्या जाणार्यांची नोंद ठेवणे, संशयितांना वेशीवरच अडवून ठेवणे हे त्यांचे कार्य होते. 4. शेतीच्या वा गावाच्या सीमांबाबत तंटे उद्भवले तर महाराचीच साक्ष अंतिम मानली जात असे. 5. महारांची स्वतंत्र चावडी असे आणि तिचा मान गाव-चावडीपेक्षा मोठा होता. 6. व्यापारी जेंव्हा आपले तांडे घेवून निघत तेंव्हा त्यांच्या रक्षणासाठी महारांची पथके नियुक्त असत...

महाराष्‍ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारीला जयंती शिवाजी महाराज यांच्‍या विषयी रंजक माहिती. महाराजांच्‍या कन्‍येकडे इतिहासकारांचे दुर्लक्ष

महाराष्‍ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारीला जयंती शिवाजी महाराज यांच्‍या विषयी रंजक माहिती. महाराजांच्‍या कन्‍येकडे इतिहासकारांचे दुर्लक्ष संभाजी महाराज आणि राजाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे पुत्र होते, हे सर्वश्रुत आहे; परंतु महाराजांना सखुबाई, राणूबाई, अंबिका, दीपा, राजकुंवरबाई आणि कमळाबाई या सहा कन्‍याही होत्‍या याची फारशी माहिती कुणाला नाही. इतिहासकारांचेही महाराजांच्‍या कन्‍येकडे दुर्लक्ष झाल्‍याचे पाहायला मिळते. सखुबाईंचा कुणासोबत झाला विवाह ? - छत्रपती शिवाजी महाराजांची थोरल्‍या कन्या सखुबाई यांचा महादजी नाईक-निंबाळकर यांच्‍यासोबत 1655 मध्‍ये विवाह झाला होता. - त्यावेळी महादजी हे फलटणचे सरदार होते. - शिवाजींच्‍या पत्‍नी सईबाई या महादजी यांच्‍या आत्‍त्‍या होत्‍या. - फलटण हे गाव आदिलशाहीच्या राज्यात महत्त्वाचे समजले जात असल्‍याने महादजी यांना आदिलशाईतील मान होता. पतीच्‍या मृत्‍यूनंतर सखुबाई गेल्‍या सती - महादजी निंबाळकर यांना आदिलशाहने बादरा चारधारा येथे ठाणेदारी दिली होती. शिवाय त्‍यांना चार हजार जात व तीन ...

महार, मांग किंवा चांभार स्पृश्यांसाठी शाळा नव्हत्या म्हणून बाबा साहेबांनी जानेवारी 1925 मध्ये सोलापूर येथे वसतीगृहाची सुरुवात केली

      http://realgodofindia.blogspot.in/ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांना शिक्षण आणि ज्ञान मिळवण्यापासून कोसो दूर ठेवण्यात आल्याची जाणीव होती. त्यामुळे त्यांनी या समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करता यावा. त्यांची संस्कृतिक प्रगती करता यावी म्हणून बहिष्कृतहित कारणी सभेची स्थापना जुलै 1924 मध्ये केली होती, या सभेच्या माध्यमातून माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यासाठी प्रथम त्यांनी जानेवारी 1925 मध्ये सोलापूर येथे वसतीगृहाची सुरुवात केली. या सभेतर्फे मुंबईत मोफत वाचन कक्ष सुरु करण्यात आले. या शिवाय महार हॉकी क्लबची स्थापना करुन या समाजातील तरुणांना खेळामध्ये नैपुण्य मिळवण्याची संधी उपलब्ध करुन दिली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1928 मध्ये बहिष्कृत समाज शिक्षण संस्थेची स्थापना केली. डॉ. बाबासाहेबांनी 1928 मध्ये दोन वसतीगृह काढून शिक्षणाच्या कार्यास सुरुवात केली हेाती. त्यांनी प्रत्येक जिल्हयातील कार्यकर्त्यांनी जिल्हयाच्या ठिकाणी वसतीगृह स्थापन करुन अस्पृश्य  मुलांच्या हायस्कूलच्या शिक्षणाची मोफत राहण्याची व जेवणाची सेाय करावी...