Skip to main content

बाबासाहेबांना हे माहित होत की स्त्रियांच्या सहभागा शिवाय समाज परिवर्तनाची चळवळ यशस्वी होऊन शकत नाही असा त्यांचा दृढ विश्‍वास होता भारतीय राज्यघटनेत पुरुषांच्या बरोबरीने सर्व हक्क स्त्रियांना देण्यामध्ये बाबासाहेब आग्रही होते

बाबासाहेबांना हे माहित होत की स्त्रियांच्या सहभागा शिवाय
समाज परिवर्तनाची चळवळ
यशस्वी होऊन शकत नाही
असा त्यांचा दृढ विश्‍वास होता
भारतीय राज्यघटनेत पुरुषांच्या
बरोबरीने सर्व हक्क स्त्रियांना
देण्यामध्ये बाबासाहेब आग्रही होते. बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या कलम १४ नुसार  देशातील सर्व स्त्री पुरुषास कायद्याने समान ठरविले व तिला स्वातंत्र्य उपभोगण्याचे समान हक्क दिले. एवढेच नव्हे तर घटनेच्या कलम ३१ (घ) नुसार स्त्री आणि पुरुषास असे दोघानांही समान कामाबद्दल समान वेतनाचा अधिकार दिला...
हिंदू कोड बिल (महिला हक्क कायदा)
मंजूर होत नाही म्हणून केंद्रिय
कायदा मंत्रीपद सोडणारे बाबासाहेब
स्त्री हक्कांबाबत कोणतीही तडजोड
करायला तयार नव्हते.
मनुस्मृतीमध्ये स्त्री म्हणजे पापाची खाण असं त्या हरामखोर मनु ब्राहम्ण  लिहून ठेवल्यामुले. आमच्याच बहिणी आमच्यासाठी शत्रू होत्या. बाबासाहेबांनी हिंदू कोडबिलाचा कायदा जर तयार केला नसता तर, आजही अनेक कर्तृत्ववान स्त्रिया रांधा, वाढा, उष्टी काढा यातच संपून गेल्या असत्या.
२० जुलै, १९४२ रोजीच्या भाषणात
ते म्हणाले होते,
‘‘तुमच्या मुलामुलींना शिक्षण द्या.
त्यांच्या मनात महत्त्वाकांक्षा रुजवा.
ते मोठे होणार आहेत असे त्यांच्या
मनावर बिंबवा. त्यांच्यातील
न्यूनगंड नाहीसा करा. लग्न
करण्याची घाई करू नका. लग्न
म्हणजे जोखीम (जबाबदारी) आहे.
लग्नामुळे निर्माण होणारी आर्थिक
जबाबदारी पेलण्याइतपत
आर्थिकदृष्टया समर्थ झाल्याशिवाय
त्यांच्यावर लग्न लादू नका. जे लग्न
करतील त्यांनी हे लक्षात ठेवले
पाहिजे की जास्त मुले जन्माला
घालणे हा गुन्हा आहे. आपल्या
लहानपणी तुम्हाला मिळू शकली
त्यापेक्षा अधिक चांगली परिस्थिती
आपल्या मुलांना देणे हे आईवडिलांचे
कर्तव्य आहे. सर्वात अधिक महत्त्वाचे
म्हणजे लग्न झालेल्   प्रत्येक स्त्रीने
पतीची मैत्रिण बनून त्याच्या कार्यात
सहकार्य करावे. पत्नी नवर्‍याच्या
बरोबरीची असते. ‘‘पत्नी ही मैत्रिण असते. गुलाम नसते’’ त्याच परिषदेत
त्यांनी महिलांना सांगितले कि
स्वच्छता पाळा , सर्व दुर्गुणांपासून
दूर राहा , मुलामुलींना शिक्षण द्या ,
त्यांना महत्त्वाकांक्षी बनवा , त्यांचा
न्यूनगंड दूर करा , अंधश्रद्धा नष्ट करा असा महत्वाचा उपदेश दिला .
हे सांगणारे क्रांतिकारक बाबासाहेब जगातील सर्वच स्त्रियांना वंदनीय आहेत.

आजच्या स्त्री- मुक्ती चळवळीने या द्रष्टया बाबासाहेबांचा
आदर्श घेतला तरच स्त्रीपुरुष समतेची चळवळ गतिमान आणि आरोग्यदायी
बनेल.
पुरुषां प्रमाणेच स्त्रियांनाही समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या . १९२७ ते १९५६ पर्यंतच्या काळात बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक ,राजकीय , कायदेशीर दर्जा वाढावा म्हणून सतत प्रयत्न केला . यासाठी त्यांनी हिंदू कोड बिल तयार लार्ण्याचे महान कार्य हाती घेतले .

पण काँग्रेस मधल्या सर्व प्रतिगामी आणि सनातनी ब्राहम्ण नी  आंबेडकरांचा विरोध करण्यासाठी एकदम उफाळून बाहेर आल्या आणि त्यांना आपल्या जागेचा राजीनामा देऊन मंत्रि मंडळातून बाहेर पडावे लागले . आंबेडकरांचे हिंदुकोड बिल जर मान्य झाले असते तर हिंदू समाजातील सर्व भेद , अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदु समाज अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता आणि भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कुणी घडवून आणली नाही ती घडून आली असती . पण दुर्दैव भारताचे ! दुर्भाग्य हिंदू समाजाचे
पांढरपेशी चळवळीतील
उच्चवर्णीय स्त्रियांना ही जाणीव
केव्हा होईल? त्यांच्या विचार आणि
आचारात बाबासाहेबांना अग्रस्थान
मिळेल काय ? ? ?
______________________
म्हणून सर्व प्रथम डॉं बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून 8 मार्च महिला दिवसाच्या सर्वांना
शुभेच्छा !!!

Comments

Popular posts from this blog

महार कोण होते?

महार कोण होते?  वेशीबाहेर राहून गावाचं रक्षण करणारा, शेती, गावांच्या सीमा सांगणारा, व्यापार्यांना संरक्षण पुरवणारा, शेतसारा आणि राज्याचा खजिना नियोजित ठिकाणी सुरक्षित पोहोचवणारा, असा समाजाचा रक्षक म्हणजे महार समाज. पण कामाच्या स्वरूपामुळं त्यांना वेशीबाहेरच ठेवण्यात आलं… महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हणजे काय हे समजावून घ्यायला पाहिजे. जे सध्या माहित आहे ते असेः 1. महार समाजाचे वास्तव्य गावकुसाबाहेर होते. 2. महार समाज ग्रामरक्षणाचे कार्य करत होता. वेशीचे रक्षण हे त्याचे नुसते कर्तव्यच नव्हे तर जबाबदारी होती. चोर नाही सापडला तर चोरीची भरपाई महारांनाच द्यावी लागत असे. 3. चोरांचा माग काढणे, गावात येणार्या जाणार्यांची नोंद ठेवणे, संशयितांना वेशीवरच अडवून ठेवणे हे त्यांचे कार्य होते. 4. शेतीच्या वा गावाच्या सीमांबाबत तंटे उद्भवले तर महाराचीच साक्ष अंतिम मानली जात असे. 5. महारांची स्वतंत्र चावडी असे आणि तिचा मान गाव-चावडीपेक्षा मोठा होता. 6. व्यापारी जेंव्हा आपले तांडे घेवून निघत तेंव्हा त्यांच्या रक्षणासाठी महारांची पथके नियुक्त असत...

२५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिन.

दि. २५ डिसेंबर १९२७ रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे सहकारी 'सहस्रबुध्दे' यांच्या हातुन विषमतावादी, जातीवादी, कर्मकांडवादी, वर्णवादी, व्यवस्थेला धरून चालणारी "मनुस्म्रूती" चे "२५/१२/१९२७" साली बाबासाहेबांनी महाड येथे मनुस्मुर्तीचे दहन केले आणि बहूजनांना जातीवादी समाजरचनेतून मुक्त केले. काही जणांना असा प्रश्न पडत असेल की, "डाॅ. बाबासाहेब आंबेडकर" यांनी "मनुस्मृती" रायगडच्या पायथ्याशीच "महाड" या ठिकाणीच का दहन केली..? देशात इतर ठिकाणी सुध्दा करता आली असती..? पण रायगडच्याच पायथ्याशीच दहन का केली..?? कारण; विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे "तथागत गौतम बुध्दांना, संत कबीरांना, छत्रपती शिवाजी महाराजांना, महात्मा फुलेंना गुरू मानायचे." छञपती शिवाजी महाराजांना शुद्र आहेत असं म्हणुन "राज्यअभिषेकाला" ब्राम्हणांनी विरोध केला होता. रायगडावर छ. शिवरायांची समाधी आहे आणि महाड हे गाव रायगडच्या पायथ्याशी आहे. म्हणजेच छ. शिवरायांच्या पायाशी मनुस्मृती जाळून ब्राम्हणांनी केलेल्या छ. शिवरायांच्या अपमानाचा ...

महाराष्‍ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारीला जयंती शिवाजी महाराज यांच्‍या विषयी रंजक माहिती. महाराजांच्‍या कन्‍येकडे इतिहासकारांचे दुर्लक्ष

महाराष्‍ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारीला जयंती शिवाजी महाराज यांच्‍या विषयी रंजक माहिती. महाराजांच्‍या कन्‍येकडे इतिहासकारांचे दुर्लक्ष संभाजी महाराज आणि राजाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे पुत्र होते, हे सर्वश्रुत आहे; परंतु महाराजांना सखुबाई, राणूबाई, अंबिका, दीपा, राजकुंवरबाई आणि कमळाबाई या सहा कन्‍याही होत्‍या याची फारशी माहिती कुणाला नाही. इतिहासकारांचेही महाराजांच्‍या कन्‍येकडे दुर्लक्ष झाल्‍याचे पाहायला मिळते. सखुबाईंचा कुणासोबत झाला विवाह ? - छत्रपती शिवाजी महाराजांची थोरल्‍या कन्या सखुबाई यांचा महादजी नाईक-निंबाळकर यांच्‍यासोबत 1655 मध्‍ये विवाह झाला होता. - त्यावेळी महादजी हे फलटणचे सरदार होते. - शिवाजींच्‍या पत्‍नी सईबाई या महादजी यांच्‍या आत्‍त्‍या होत्‍या. - फलटण हे गाव आदिलशाहीच्या राज्यात महत्त्वाचे समजले जात असल्‍याने महादजी यांना आदिलशाईतील मान होता. पतीच्‍या मृत्‍यूनंतर सखुबाई गेल्‍या सती - महादजी निंबाळकर यांना आदिलशाहने बादरा चारधारा येथे ठाणेदारी दिली होती. शिवाय त्‍यांना चार हजार जात व तीन ...