Skip to main content

“१० रुपयाच्या प्रसादाने देव पावत नाही, भीमराव आंबेडकरच खरे देव आहेत”

"आजी मला सांगत आली, बाळ, देव कुठे आहे हे कोणालाच ठाऊक नाही. मी माझ्या गेल्या ८० वर्षांच्या आयुष्यात शोधत आले, पण तो कुठेच दिसला नाही. माझ्या आईने देखील मला सांगितले होते, तिलाही तो कधीच दिसला नाही. कारण ज्यांनी वर्षानुवर्षे देवाला फुले, नारळ, महाप्रसाद अर्पण केले, त्यांना कधीच देव पावला नाही, तर मग तू १० रुपयांच्या प्रसादाने काय साधणार आहेस? लाखो भिकारी देवळांच्या, मस्जिदींच्या दारात बसून देव-देव करत आयुष्यभर काढतात, त्यांनाही देव कधी पावला नाही. मग तुला का पावणार? आजी सांगत होती की मी गेल्या ८० वर्षांपासून एकच गोष्ट ऐकत आले आहे: देव फक्त त्यांनाच पावतो, जे माणूसकीने जगतात, ब्राह्मणांना दान देतात, आणि इतरांच्या भल्याचा विचार करतात. पण मग शेतकऱ्यांच्या नशिबात अशी वेळ का येते की त्यांना आत्महत्या करावी लागते? जो देव लाखो लोकांचे भले करणाऱ्या शेतकऱ्याला पावत नाही, तो तुला या १० रुपयांच्या प्रसादांनी काय पावणार? आजी म्हणाली, मला एकच देव सापडला, आणि तो म्हणजे बाबासाहेब भीमराव आंबेडकर. त्यांनी कधी कोणामध्ये भेदभाव केला नाही, सर्वांसाठी समान न्याय दिला. त्यांनी सर्व धर्मांसाठी एकच कायदा लागू केला. बाबासाहेबांना कधी कोणी प्रसाद दिला नाही, तरी त्यांनी आपल्या साठी एवढं मोठं कार्य केलं, की आपण त्यांचे आभार मानले तरी ते कमीच ठरेल. आज त्यांच्या कारणाने बाळ, तू शाळेत जात आहेस, तुझे आई-बाबा काम करू शकत आहेत. नाहीतर आपण सगळे रोडवर 'देव देव' करत, हातात टाळ घेऊन फिरत असतो. कदाचित आपल्याला टाळ घेण्याची संधीही मिळाली नसती. म्हणून रोज सकाळी उठून आई-बाबांच्या पाया पडणे विसरलात तरी चालेल, पण बाबासाहेबांच्या पाया पडणे कधीच विसरू नका. त्यांनीच आपलं जगणं अधिक सुलभ केलं आहे. १० रुपयांच्या प्रसादांनी कोणी पावत नाही, उपास करूनही कोणी पावत नाही. उपवासांनी देव पावला असता, तर लाखो लोक उपाशी राहून मरण पावले नसते. म्हणून बाळ, तुला सांगते, कोणत्याही दगडाच्या मूर्तीकडे धाव घेऊ नकोस, सगळे दगड एकसारखेच असतात, फक्त त्यांचं रूप आणि मांडणी वेगळी असते. जयभीम! आज आपल्या देशाला बाबासाहेबांच्या विचारांची खऱ्या अर्थाने गरज आहे." माझा लेख कसा वाटला हे नक्की कळवा, आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका! अमोल गौतम ,शोभा भालेराव ---

Comments

Popular posts from this blog

महार कोण होते?

महार कोण होते?  वेशीबाहेर राहून गावाचं रक्षण करणारा, शेती, गावांच्या सीमा सांगणारा, व्यापार्यांना संरक्षण पुरवणारा, शेतसारा आणि राज्याचा खजिना नियोजित ठिकाणी सुरक्षित पोहोचवणारा, असा समाजाचा रक्षक म्हणजे महार समाज. पण कामाच्या स्वरूपामुळं त्यांना वेशीबाहेरच ठेवण्यात आलं… महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हणजे काय हे समजावून घ्यायला पाहिजे. जे सध्या माहित आहे ते असेः 1. महार समाजाचे वास्तव्य गावकुसाबाहेर होते. 2. महार समाज ग्रामरक्षणाचे कार्य करत होता. वेशीचे रक्षण हे त्याचे नुसते कर्तव्यच नव्हे तर जबाबदारी होती. चोर नाही सापडला तर चोरीची भरपाई महारांनाच द्यावी लागत असे. 3. चोरांचा माग काढणे, गावात येणार्या जाणार्यांची नोंद ठेवणे, संशयितांना वेशीवरच अडवून ठेवणे हे त्यांचे कार्य होते. 4. शेतीच्या वा गावाच्या सीमांबाबत तंटे उद्भवले तर महाराचीच साक्ष अंतिम मानली जात असे. 5. महारांची स्वतंत्र चावडी असे आणि तिचा मान गाव-चावडीपेक्षा मोठा होता. 6. व्यापारी जेंव्हा आपले तांडे घेवून निघत तेंव्हा त्यांच्या रक्षणासाठी महारांची पथके नियुक्त असत...

२५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिन.

दि. २५ डिसेंबर १९२७ रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे सहकारी 'सहस्रबुध्दे' यांच्या हातुन विषमतावादी, जातीवादी, कर्मकांडवादी, वर्णवादी, व्यवस्थेला धरून चालणारी "मनुस्म्रूती" चे "२५/१२/१९२७" साली बाबासाहेबांनी महाड येथे मनुस्मुर्तीचे दहन केले आणि बहूजनांना जातीवादी समाजरचनेतून मुक्त केले. काही जणांना असा प्रश्न पडत असेल की, "डाॅ. बाबासाहेब आंबेडकर" यांनी "मनुस्मृती" रायगडच्या पायथ्याशीच "महाड" या ठिकाणीच का दहन केली..? देशात इतर ठिकाणी सुध्दा करता आली असती..? पण रायगडच्याच पायथ्याशीच दहन का केली..?? कारण; विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे "तथागत गौतम बुध्दांना, संत कबीरांना, छत्रपती शिवाजी महाराजांना, महात्मा फुलेंना गुरू मानायचे." छञपती शिवाजी महाराजांना शुद्र आहेत असं म्हणुन "राज्यअभिषेकाला" ब्राम्हणांनी विरोध केला होता. रायगडावर छ. शिवरायांची समाधी आहे आणि महाड हे गाव रायगडच्या पायथ्याशी आहे. म्हणजेच छ. शिवरायांच्या पायाशी मनुस्मृती जाळून ब्राम्हणांनी केलेल्या छ. शिवरायांच्या अपमानाचा ...

महाराष्‍ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारीला जयंती शिवाजी महाराज यांच्‍या विषयी रंजक माहिती. महाराजांच्‍या कन्‍येकडे इतिहासकारांचे दुर्लक्ष

महाराष्‍ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारीला जयंती शिवाजी महाराज यांच्‍या विषयी रंजक माहिती. महाराजांच्‍या कन्‍येकडे इतिहासकारांचे दुर्लक्ष संभाजी महाराज आणि राजाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे पुत्र होते, हे सर्वश्रुत आहे; परंतु महाराजांना सखुबाई, राणूबाई, अंबिका, दीपा, राजकुंवरबाई आणि कमळाबाई या सहा कन्‍याही होत्‍या याची फारशी माहिती कुणाला नाही. इतिहासकारांचेही महाराजांच्‍या कन्‍येकडे दुर्लक्ष झाल्‍याचे पाहायला मिळते. सखुबाईंचा कुणासोबत झाला विवाह ? - छत्रपती शिवाजी महाराजांची थोरल्‍या कन्या सखुबाई यांचा महादजी नाईक-निंबाळकर यांच्‍यासोबत 1655 मध्‍ये विवाह झाला होता. - त्यावेळी महादजी हे फलटणचे सरदार होते. - शिवाजींच्‍या पत्‍नी सईबाई या महादजी यांच्‍या आत्‍त्‍या होत्‍या. - फलटण हे गाव आदिलशाहीच्या राज्यात महत्त्वाचे समजले जात असल्‍याने महादजी यांना आदिलशाईतील मान होता. पतीच्‍या मृत्‍यूनंतर सखुबाई गेल्‍या सती - महादजी निंबाळकर यांना आदिलशाहने बादरा चारधारा येथे ठाणेदारी दिली होती. शिवाय त्‍यांना चार हजार जात व तीन ...