आजी माझी सांगत आली जर लाखो ,करोडो लोकांचे भले करणाऱ्या शेतकर्यला जो पावत नाही तो तुला या १० रुपयाच्या प्रसादांनी काय पावणार

आजी माझी सांगत आली बाळ देव आहे कुठे मला पण माहित नाही 
  मी माझ्या वयाच्या  गेल्या ८० वर्षा पासून बगत आली आहे तो मला कुठे नाही दिसला,
मला माज्या आई ने पण सांगितले होते त्यांना पण कधी नाही दिसला 
              कारण जे देवांना फुले,नारळ ,महाप्रसाद विकणारे वर्षानो वर्षे तेच करत आहेत त्यांना कधी नाही पावला तर तू १० रुपयाचा प्रसाद देवाला देऊन तुला काय पावणार आहे का
लाखो भिकारी देवळा ,मस्जिद जवळ बसून बसून आविश्यभर देव देव करतच   आले त्यांना कधी नाही दिसला तुम्हाला काय पावणार 
             आजी माजी सांगत होते मी फक्त गेली ८० वर्ष एकच ऐकत आले आहे देव फक्त त्यांनाच पावतो जो माणूस ब्राह्मणान दान देतो,दुसर्यांच्या भल्याचा विचार करतो 
मग शेतकरी  वर अशी का वेळ येते कि तो  फाशी घेतो ,जर लाखो ,करोडो लोकांचे भले करणाऱ्या शेतकर्यला जो पावत नाही तो तुला या १० रुपयाच्या प्रसादांनी काय पावणार 
     आजी माजी सांगते आपल्याला एकच देव सापडला तो मंजे भीमराव आंबेडकर त्यांनी कधी कोणा मध्ये मत भेद नाही केला तो सर्वांचा सारखा होता त्यांनी सर्व धर्मा साठी एकच कायदा केला. त्यांना हमी कधी प्रसाद नाही दिला न कधी त्यांना हमी १० रुपेय दिले त्यांनी आज आपल्या साठी एवडे काही केले आहे कि तुम्ही आज तुमचा सोताचा जीव जरी दिले तरी सुधा कमीच आहे ,आज त्यांचे मुळे बाळ तू शाळे मध्ये जात आहेस ,तुझे बाबा ,आई काम करत आहे ,नाही तर आज आपण सगळे जन रोडनि  देव देव करत हाता मध्ये टाळ घेऊन फिरलो असतो ,काय माहित टाळ पण आपल्याला हातात मिळाली असती कि नाही माहित नाही .
     
म्हणून रोज सकाळी उठून कधी आई  बाबांच्या पाया पडणे विसरा पण बाबासाहेबांच्या पाया पडायला विसरू नका ,करा तुमचा मायबाप तोच आहे त्यांचा  मुळे आपण जगत आहेत
 १० रुपयाच्या प्रसादांनी कोणी पावणार नाही ,ना उपास करून कोणी पावणार नाही 
उपवास करून जर तो पावला असता तर लाखो लोक उपाशी पोठीच मरत आहेत 
 म्हणून मी बाळ तुला सांगत आहे कोणत्या पण दगडाच्या पाटी माघे धाऊ नको सर्व दगडी सारखीच असतात ,फक्त त्याचा पोषक वेगळा असतो 
 जयभीम 
    आज खरच बाबासाहेबांच्या विचाराची गरज आपल्या देशाला आहे 
 माझा लेख कसा वाठला नक्की सांगा ,मित्रांना फोरवर्ड नक्की करा 

Comments

Popular posts from this blog

महार कोण होते?

२५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिन.

महार, मांग किंवा चांभार स्पृश्यांसाठी शाळा नव्हत्या म्हणून बाबा साहेबांनी जानेवारी 1925 मध्ये सोलापूर येथे वसतीगृहाची सुरुवात केली