Skip to main content

३ जानेवारी. सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांची जयंती. नव्या वर्षातला पहिला सण, अर्थात सावित्री उत्सव

1)स्त्रीयांचा तर…. ३ जानेवारी. हक्कांचा  दिवस सण..   सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांची जयंती. नव्या वर्षातला पहिला सण, अर्थात सावित्री उत्सव !

2)  घरातल्या सगळ्यांनी मिळून घर सजवायचं, रंगवायचं, नटवायचं.
3) .रोषणाई,फुलाचे तोरण ,कंदील, रांगोळी, गोडधोड पदार्थांची मेजवानी करायची.
कोणी विचारलं की सांगायचं, आज आमचा मोठा सण, सावित्री उत्सव 
4).सावित्री उत्सवाचे विविध प्लान बनवा. मैत्रीणी मिळून फिरायला जा

----------------------------------- ----
३ जानेवारी. सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांची जयंती. नव्या वर्षातला पहिला सण, अर्थात सावित्री उत्सव !!
गेल्या वर्षी ' नव विचार आंदोलना'ने सावित्री उत्सवाची संकल्पना मांडली आणि ती महाराष्ट्राने उचलून धरली.
स्त्रीयांचा तर हक्कांचा दिवस. उदया 3 जानेवारी या दिवशी घरातल्या सगळ्यांनी मिळून घर सजवायचं, रंगवायचं, नटवायचं...रोषणाई,फुलाचे तोरण ,कंदील, रांगोळी, गोडधोड पदार्थांची मेजवानी करायची.
कोणी विचारलं की सांगायचं, आज आमचा मोठा सण, सावित्री उत्सव .
ती माऊली न हारता, सहशिक्षिका फातिमा शेख यांच्या साथीने, शिव्याशाप झेलत, दगडधोंडे, चिखलशेणाचे गोळे सहन करीत, घरा बाहेर पडली आणि आत्मसन्मानाच्या दिशेने खंबीर होऊन चालत राहिली, म्हणून आमची सक्षमीकरणाची पाऊलवाट तयार झाली, आज तिच्या मुळेच आम्ही सर्व क्षेत्रात उभ्या राहू शकलो,आज जे कोणी आम्ही आहोत ते या सावित्रीमाई मुळे , हे सांगा सगळ्यांना ठणकावून.
      3 जानेवारी हा तिच्या बद्धल ऋण व्यक्त करणयाचा दिवस....
सावित्री उत्सवाचे विविध प्लान बनवा. मैत्रीणी मिळून फिरायला जा, पिकनिक काढा, हॉटेलात एकत्र जेवण करा, पार्टीचं आयोजन करा, गप्पा मारा, गाणी म्हणा, हसा, खेळा, मज्जा करा !!! सांगा सगळ्यांना, आज सावित्री उत्सव. आजचा दिवस फक्त आमचा आणि आमच्यासाठी !!!
वर्षातील या पहिल्या उत्सवदिनापासूनच मिळालेली उर्जा साठवून ठेवायची वर्षभर, मानसन्मानाच्या, हक्कांच्या, आत्मभानाच्या, सक्षमीकरणाच्या, स्वतंत्र अस्तित्वासाठीच्या सर्व लढाया लढण्यासाठी !!!
आणि ३ जानेवारीला जर आपल्या भागात सार्वजनिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं असेल, तर तिथेही  सर्वानी सहभागी होऊया !!!
चला, लागूया उदयाच्या तयारीला.
वर्षातला पहिला सण,
सावित्री उत्सवाच्या.

Comments

Popular posts from this blog

महार कोण होते?

महार कोण होते?  वेशीबाहेर राहून गावाचं रक्षण करणारा, शेती, गावांच्या सीमा सांगणारा, व्यापार्यांना संरक्षण पुरवणारा, शेतसारा आणि राज्याचा खजिना नियोजित ठिकाणी सुरक्षित पोहोचवणारा, असा समाजाचा रक्षक म्हणजे महार समाज. पण कामाच्या स्वरूपामुळं त्यांना वेशीबाहेरच ठेवण्यात आलं… महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हणजे काय हे समजावून घ्यायला पाहिजे. जे सध्या माहित आहे ते असेः 1. महार समाजाचे वास्तव्य गावकुसाबाहेर होते. 2. महार समाज ग्रामरक्षणाचे कार्य करत होता. वेशीचे रक्षण हे त्याचे नुसते कर्तव्यच नव्हे तर जबाबदारी होती. चोर नाही सापडला तर चोरीची भरपाई महारांनाच द्यावी लागत असे. 3. चोरांचा माग काढणे, गावात येणार्या जाणार्यांची नोंद ठेवणे, संशयितांना वेशीवरच अडवून ठेवणे हे त्यांचे कार्य होते. 4. शेतीच्या वा गावाच्या सीमांबाबत तंटे उद्भवले तर महाराचीच साक्ष अंतिम मानली जात असे. 5. महारांची स्वतंत्र चावडी असे आणि तिचा मान गाव-चावडीपेक्षा मोठा होता. 6. व्यापारी जेंव्हा आपले तांडे घेवून निघत तेंव्हा त्यांच्या रक्षणासाठी महारांची पथके नियुक्त असत...

महाराष्‍ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारीला जयंती शिवाजी महाराज यांच्‍या विषयी रंजक माहिती. महाराजांच्‍या कन्‍येकडे इतिहासकारांचे दुर्लक्ष

महाराष्‍ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारीला जयंती शिवाजी महाराज यांच्‍या विषयी रंजक माहिती. महाराजांच्‍या कन्‍येकडे इतिहासकारांचे दुर्लक्ष संभाजी महाराज आणि राजाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे पुत्र होते, हे सर्वश्रुत आहे; परंतु महाराजांना सखुबाई, राणूबाई, अंबिका, दीपा, राजकुंवरबाई आणि कमळाबाई या सहा कन्‍याही होत्‍या याची फारशी माहिती कुणाला नाही. इतिहासकारांचेही महाराजांच्‍या कन्‍येकडे दुर्लक्ष झाल्‍याचे पाहायला मिळते. सखुबाईंचा कुणासोबत झाला विवाह ? - छत्रपती शिवाजी महाराजांची थोरल्‍या कन्या सखुबाई यांचा महादजी नाईक-निंबाळकर यांच्‍यासोबत 1655 मध्‍ये विवाह झाला होता. - त्यावेळी महादजी हे फलटणचे सरदार होते. - शिवाजींच्‍या पत्‍नी सईबाई या महादजी यांच्‍या आत्‍त्‍या होत्‍या. - फलटण हे गाव आदिलशाहीच्या राज्यात महत्त्वाचे समजले जात असल्‍याने महादजी यांना आदिलशाईतील मान होता. पतीच्‍या मृत्‍यूनंतर सखुबाई गेल्‍या सती - महादजी निंबाळकर यांना आदिलशाहने बादरा चारधारा येथे ठाणेदारी दिली होती. शिवाय त्‍यांना चार हजार जात व तीन ...

महार, मांग किंवा चांभार स्पृश्यांसाठी शाळा नव्हत्या म्हणून बाबा साहेबांनी जानेवारी 1925 मध्ये सोलापूर येथे वसतीगृहाची सुरुवात केली

      http://realgodofindia.blogspot.in/ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांना शिक्षण आणि ज्ञान मिळवण्यापासून कोसो दूर ठेवण्यात आल्याची जाणीव होती. त्यामुळे त्यांनी या समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करता यावा. त्यांची संस्कृतिक प्रगती करता यावी म्हणून बहिष्कृतहित कारणी सभेची स्थापना जुलै 1924 मध्ये केली होती, या सभेच्या माध्यमातून माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यासाठी प्रथम त्यांनी जानेवारी 1925 मध्ये सोलापूर येथे वसतीगृहाची सुरुवात केली. या सभेतर्फे मुंबईत मोफत वाचन कक्ष सुरु करण्यात आले. या शिवाय महार हॉकी क्लबची स्थापना करुन या समाजातील तरुणांना खेळामध्ये नैपुण्य मिळवण्याची संधी उपलब्ध करुन दिली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1928 मध्ये बहिष्कृत समाज शिक्षण संस्थेची स्थापना केली. डॉ. बाबासाहेबांनी 1928 मध्ये दोन वसतीगृह काढून शिक्षणाच्या कार्यास सुरुवात केली हेाती. त्यांनी प्रत्येक जिल्हयातील कार्यकर्त्यांनी जिल्हयाच्या ठिकाणी वसतीगृह स्थापन करुन अस्पृश्य  मुलांच्या हायस्कूलच्या शिक्षणाची मोफत राहण्याची व जेवणाची सेाय करावी...