Skip to main content

प्रत्येक मुलीने वाचावे. डॉ. आंबेडकरानी हिंदू धर्म सुधारण्यासाठी 20 वर्षे वाट पाहिली

प्रत्येक मुलीने वाचावे....
डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी काळाराम मंदिर प्रवेश, महाडच्या तळ्याचा सत्याग्रह का केला, हिंदू कोड बिल का लिहले, यावर आज परत नव्याने चर्चा होण्याची गरज आहे. त्यावेळी असलेले वंचित शोषित हे हिंदू मध्ये गणले जायचे. परंतु मंदिर व पाण्याच्या मुद्यावर त्यांचे हिंदुत्व नाकारले जायचे. आजही स्त्रियाना मंदिरात प्रवेश नाकारला जातोय. मशीनद्वारे स्त्रियाना मासिक पाळी आहे की नाही हे तपासूनच मंदिरात प्रवेश द्यावा, असा आदेश म्हणजे गुलामगिरीचे द्योतक आहे. आंबेडकरानी 80 वर्षांपूर्वी केलेल्या आंदोलनाचे संदर्भ आजही कायम असतील, आजही स्त्रिया-वंचिताना धर्मोपासनापासून वंचित ठेवण्यात येत असेल तर हा देश कुठल्या दिशेने जात आहे, हे सांगायला कोणी द्रष्टा लागणार नाही.
       डॉ. आंबेडकरानी हिंदू धर्म सुधारण्यासाठी 20 वर्षे वाट पाहिली. हिंदू धर्मात कालानुरुप बदल व्हावेत, प्रत्येकाला आचरण करता यावा असा धर्म त्याना अभिप्रेत होता. असमानतेवर आधारित धर्म नको होता.
डॉ. आंबेडकरानी तयार केलेले 'हिंदू कोड बिल' हे भारतीय स्त्रियांच्या मुक्तीचे बायबल होते. त्यानुसार भारतीय हिंदू स्त्रियाना आंतरजातीय विवाहास मान्यता, एकपत्नीत्वाचे बंधन, पुरुषाप्रमाणेच स्त्रीलासुध्दा घटस्फोट मागण्याचा अधिकार, मुलाइतकाच मुलीलासुध्दा वडिलोपार्जित संपत्तीत अधिकार, दत्तक विधान यासारखे अधिकार प्राप्त होणार होते. दुर्दैव इतके की, त्या काळातील स्त्रियानीच अडाणीपणातून हिंदू कोड बिलला विरोध केला. आज एकटीच स्त्री आपल्या हक्कासाठी लढताना पाहून त्यावेळच्या भारतीयांचा राग आल्याशिवाय राहत नाही. जागतिक अर्थतज्ञ असलेले डॉ. आंबेडकर म्हणतात, "मी कुठल्याही देशाची प्रगती ही त्या देशात झालेल्या स्त्रियांच्या विकासावरुन ठरवतो."
स्त्रियांच्या या ज्वलंत प्रश्नाला स्त्रियांकडून आणि संसदेत होणारा विरोध लक्षात घेउन डॉ. आंबेडकरानी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आज या प्रश्नाची दाहकता किती आहे, याची जाणिव भगिणीना झाल्याशिवाय राहणार नाही.
आज भारताला महासत्ता म्हणून उदयाला यायचे असेल तर 50% स्त्रियाना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करुन घेतले पाहिजे. स्त्रियांवर बंधने लादून आपण महासत्तेची स्वप्न पाहणार असू तर आपल्यासारखे ढोंगी दुसरे कोणी असूच शकत नाही.

Comments

Popular posts from this blog

महार कोण होते?

महार कोण होते?  वेशीबाहेर राहून गावाचं रक्षण करणारा, शेती, गावांच्या सीमा सांगणारा, व्यापार्यांना संरक्षण पुरवणारा, शेतसारा आणि राज्याचा खजिना नियोजित ठिकाणी सुरक्षित पोहोचवणारा, असा समाजाचा रक्षक म्हणजे महार समाज. पण कामाच्या स्वरूपामुळं त्यांना वेशीबाहेरच ठेवण्यात आलं… महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हणजे काय हे समजावून घ्यायला पाहिजे. जे सध्या माहित आहे ते असेः 1. महार समाजाचे वास्तव्य गावकुसाबाहेर होते. 2. महार समाज ग्रामरक्षणाचे कार्य करत होता. वेशीचे रक्षण हे त्याचे नुसते कर्तव्यच नव्हे तर जबाबदारी होती. चोर नाही सापडला तर चोरीची भरपाई महारांनाच द्यावी लागत असे. 3. चोरांचा माग काढणे, गावात येणार्या जाणार्यांची नोंद ठेवणे, संशयितांना वेशीवरच अडवून ठेवणे हे त्यांचे कार्य होते. 4. शेतीच्या वा गावाच्या सीमांबाबत तंटे उद्भवले तर महाराचीच साक्ष अंतिम मानली जात असे. 5. महारांची स्वतंत्र चावडी असे आणि तिचा मान गाव-चावडीपेक्षा मोठा होता. 6. व्यापारी जेंव्हा आपले तांडे घेवून निघत तेंव्हा त्यांच्या रक्षणासाठी महारांची पथके नियुक्त असत...

महाराष्‍ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारीला जयंती शिवाजी महाराज यांच्‍या विषयी रंजक माहिती. महाराजांच्‍या कन्‍येकडे इतिहासकारांचे दुर्लक्ष

महाराष्‍ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारीला जयंती शिवाजी महाराज यांच्‍या विषयी रंजक माहिती. महाराजांच्‍या कन्‍येकडे इतिहासकारांचे दुर्लक्ष संभाजी महाराज आणि राजाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे पुत्र होते, हे सर्वश्रुत आहे; परंतु महाराजांना सखुबाई, राणूबाई, अंबिका, दीपा, राजकुंवरबाई आणि कमळाबाई या सहा कन्‍याही होत्‍या याची फारशी माहिती कुणाला नाही. इतिहासकारांचेही महाराजांच्‍या कन्‍येकडे दुर्लक्ष झाल्‍याचे पाहायला मिळते. सखुबाईंचा कुणासोबत झाला विवाह ? - छत्रपती शिवाजी महाराजांची थोरल्‍या कन्या सखुबाई यांचा महादजी नाईक-निंबाळकर यांच्‍यासोबत 1655 मध्‍ये विवाह झाला होता. - त्यावेळी महादजी हे फलटणचे सरदार होते. - शिवाजींच्‍या पत्‍नी सईबाई या महादजी यांच्‍या आत्‍त्‍या होत्‍या. - फलटण हे गाव आदिलशाहीच्या राज्यात महत्त्वाचे समजले जात असल्‍याने महादजी यांना आदिलशाईतील मान होता. पतीच्‍या मृत्‍यूनंतर सखुबाई गेल्‍या सती - महादजी निंबाळकर यांना आदिलशाहने बादरा चारधारा येथे ठाणेदारी दिली होती. शिवाय त्‍यांना चार हजार जात व तीन ...

महार, मांग किंवा चांभार स्पृश्यांसाठी शाळा नव्हत्या म्हणून बाबा साहेबांनी जानेवारी 1925 मध्ये सोलापूर येथे वसतीगृहाची सुरुवात केली

      http://realgodofindia.blogspot.in/ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांना शिक्षण आणि ज्ञान मिळवण्यापासून कोसो दूर ठेवण्यात आल्याची जाणीव होती. त्यामुळे त्यांनी या समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करता यावा. त्यांची संस्कृतिक प्रगती करता यावी म्हणून बहिष्कृतहित कारणी सभेची स्थापना जुलै 1924 मध्ये केली होती, या सभेच्या माध्यमातून माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यासाठी प्रथम त्यांनी जानेवारी 1925 मध्ये सोलापूर येथे वसतीगृहाची सुरुवात केली. या सभेतर्फे मुंबईत मोफत वाचन कक्ष सुरु करण्यात आले. या शिवाय महार हॉकी क्लबची स्थापना करुन या समाजातील तरुणांना खेळामध्ये नैपुण्य मिळवण्याची संधी उपलब्ध करुन दिली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1928 मध्ये बहिष्कृत समाज शिक्षण संस्थेची स्थापना केली. डॉ. बाबासाहेबांनी 1928 मध्ये दोन वसतीगृह काढून शिक्षणाच्या कार्यास सुरुवात केली हेाती. त्यांनी प्रत्येक जिल्हयातील कार्यकर्त्यांनी जिल्हयाच्या ठिकाणी वसतीगृह स्थापन करुन अस्पृश्य  मुलांच्या हायस्कूलच्या शिक्षणाची मोफत राहण्याची व जेवणाची सेाय करावी...