Skip to main content

छत्रपती शाहू महाराज ,भीमराव रामजी आंबेडकर

आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात फुले-शाहू-आंबेडकर कालखंडाला 

अनन्यसाधारण महत्त्व आहे.

या तीन महापुरुषांच्या परिवर्तनवादी विचार आणि कृतीने त्यांचा काळ हा बहुजनांच्या प्रबोधनाचा काळ मानला जातो. शाहू आणि आंबेडकर या दोन महापुरुषांमध्ये वैयक्तिक आणि वैचारीक ऋणानुबंध निर्माण झाले होते.
95 वर्षांपूर्वी दोन महापुरुषांमधील ऐतिहासिक संवाद-

बाबासाहेब जेव्हा लंडनला होते, त्या वेळी त्यांनी शाहू महाराजांना शिक्षणासाठी अर्थिक मदतीसाठी पत्रं लिहिली
आहेत. त्याचबरोबर नागपूर परिषदेसंदर्भातही पत्रं लिहिली आहेत. 95 वर्षापूर्वीची 1920 आणि 1921 या दोन वर्षातील डॉ. आंबेडकरांनी राजर्षी शाहू महाराजांना लिहिलेली तीन पत्रं शाहूंचे मार्गदर्शक, सल्लागार आणि कोल्हापूर संस्थानचे दिवाण सर रघुनाथराव सबनिस यांच्या खासगी दप्तरात होती. ती त्यांच्या पणती अँड. सुमेधा सबनिस यांनी इतिहास संशोधक मंजुश्री पवार यांच्याकडे सुपूर्द केली आहेत.
पहिलं पत्र :पहिले पत्र डॉ. आंबेडकरांनी राजर्षी शाहूंना ‘मुकनायक’च्या मुंबई कार्यालयातून लिहिले आहे. या पत्रावर तारिख नाही, पण या पत्रात डॉ. आंबेडकरांनी शाहू नागपूरच्या परिषदेला येणार असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तसेच नागपूर परिषदेतील शाहू महाराजांचे भाषण छापण्यापूर्वी आपणास पहायला मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यावरुन हे पत्र 20 मे 1920 ला नागपुरात झालेल्या अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषदेच्या आगोदर लिहीले आहे, हे स्पष्ट होते.

दुसरं पत्र :दुसरे पत्र हे 6 ऑक्टोबर 1921 साली बाबासाहेबांनी लंडनहून लिहिले आहे. आपण आर्थिक अडचणीत असल्याचा उल्लेख आहे. आपणास 200 पौंडांची गरज आहे, असा उल्लेख आढळतो. तसेच विशेष म्हणजे कोल्हापूर संस्थानचे स्टेट रेकॉर्ड चोरीस गेल्याची वार्ता आपणास लंडन मध्ये कळाली याचाही उल्लेख या पत्रामध्ये आढळतो.


तिसरं पत्रं :
तिसरे पत्रही बाबासाहेबांनी शाहू महाराजांना 20 ऑक्टोबर 1921 रोजी लंडनहून इंग्रजीत लिहीले आहे. या पत्रात डॉ. आंबेडकरांनी त्यांना 107 पौंडाची मागील आठवड्यात त्वरित मदत मिळाली, असा उल्लेख आहे. त्याबद्दल बाबासाहेबांनी पत्रातून आभारही व्यक्त केला आहे. तसेच मायदेशी आल्यानंतर आपणाकडून घेतलेल्या पैशांची परतफेड करु असाही उल्लेख आहे. या पत्रात पुन्हा बाबासाहेबांनी स्टेट रेकॉर्डच्या चोरीचा उल्लेख केला आहे.

Comments

Popular posts from this blog

महार कोण होते?

महार कोण होते?  वेशीबाहेर राहून गावाचं रक्षण करणारा, शेती, गावांच्या सीमा सांगणारा, व्यापार्यांना संरक्षण पुरवणारा, शेतसारा आणि राज्याचा खजिना नियोजित ठिकाणी सुरक्षित पोहोचवणारा, असा समाजाचा रक्षक म्हणजे महार समाज. पण कामाच्या स्वरूपामुळं त्यांना वेशीबाहेरच ठेवण्यात आलं… महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हणजे काय हे समजावून घ्यायला पाहिजे. जे सध्या माहित आहे ते असेः 1. महार समाजाचे वास्तव्य गावकुसाबाहेर होते. 2. महार समाज ग्रामरक्षणाचे कार्य करत होता. वेशीचे रक्षण हे त्याचे नुसते कर्तव्यच नव्हे तर जबाबदारी होती. चोर नाही सापडला तर चोरीची भरपाई महारांनाच द्यावी लागत असे. 3. चोरांचा माग काढणे, गावात येणार्या जाणार्यांची नोंद ठेवणे, संशयितांना वेशीवरच अडवून ठेवणे हे त्यांचे कार्य होते. 4. शेतीच्या वा गावाच्या सीमांबाबत तंटे उद्भवले तर महाराचीच साक्ष अंतिम मानली जात असे. 5. महारांची स्वतंत्र चावडी असे आणि तिचा मान गाव-चावडीपेक्षा मोठा होता. 6. व्यापारी जेंव्हा आपले तांडे घेवून निघत तेंव्हा त्यांच्या रक्षणासाठी महारांची पथके नियुक्त असत...

महाराष्‍ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारीला जयंती शिवाजी महाराज यांच्‍या विषयी रंजक माहिती. महाराजांच्‍या कन्‍येकडे इतिहासकारांचे दुर्लक्ष

महाराष्‍ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारीला जयंती शिवाजी महाराज यांच्‍या विषयी रंजक माहिती. महाराजांच्‍या कन्‍येकडे इतिहासकारांचे दुर्लक्ष संभाजी महाराज आणि राजाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे पुत्र होते, हे सर्वश्रुत आहे; परंतु महाराजांना सखुबाई, राणूबाई, अंबिका, दीपा, राजकुंवरबाई आणि कमळाबाई या सहा कन्‍याही होत्‍या याची फारशी माहिती कुणाला नाही. इतिहासकारांचेही महाराजांच्‍या कन्‍येकडे दुर्लक्ष झाल्‍याचे पाहायला मिळते. सखुबाईंचा कुणासोबत झाला विवाह ? - छत्रपती शिवाजी महाराजांची थोरल्‍या कन्या सखुबाई यांचा महादजी नाईक-निंबाळकर यांच्‍यासोबत 1655 मध्‍ये विवाह झाला होता. - त्यावेळी महादजी हे फलटणचे सरदार होते. - शिवाजींच्‍या पत्‍नी सईबाई या महादजी यांच्‍या आत्‍त्‍या होत्‍या. - फलटण हे गाव आदिलशाहीच्या राज्यात महत्त्वाचे समजले जात असल्‍याने महादजी यांना आदिलशाईतील मान होता. पतीच्‍या मृत्‍यूनंतर सखुबाई गेल्‍या सती - महादजी निंबाळकर यांना आदिलशाहने बादरा चारधारा येथे ठाणेदारी दिली होती. शिवाय त्‍यांना चार हजार जात व तीन ...

महार, मांग किंवा चांभार स्पृश्यांसाठी शाळा नव्हत्या म्हणून बाबा साहेबांनी जानेवारी 1925 मध्ये सोलापूर येथे वसतीगृहाची सुरुवात केली

      http://realgodofindia.blogspot.in/ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांना शिक्षण आणि ज्ञान मिळवण्यापासून कोसो दूर ठेवण्यात आल्याची जाणीव होती. त्यामुळे त्यांनी या समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करता यावा. त्यांची संस्कृतिक प्रगती करता यावी म्हणून बहिष्कृतहित कारणी सभेची स्थापना जुलै 1924 मध्ये केली होती, या सभेच्या माध्यमातून माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यासाठी प्रथम त्यांनी जानेवारी 1925 मध्ये सोलापूर येथे वसतीगृहाची सुरुवात केली. या सभेतर्फे मुंबईत मोफत वाचन कक्ष सुरु करण्यात आले. या शिवाय महार हॉकी क्लबची स्थापना करुन या समाजातील तरुणांना खेळामध्ये नैपुण्य मिळवण्याची संधी उपलब्ध करुन दिली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1928 मध्ये बहिष्कृत समाज शिक्षण संस्थेची स्थापना केली. डॉ. बाबासाहेबांनी 1928 मध्ये दोन वसतीगृह काढून शिक्षणाच्या कार्यास सुरुवात केली हेाती. त्यांनी प्रत्येक जिल्हयातील कार्यकर्त्यांनी जिल्हयाच्या ठिकाणी वसतीगृह स्थापन करुन अस्पृश्य  मुलांच्या हायस्कूलच्या शिक्षणाची मोफत राहण्याची व जेवणाची सेाय करावी...