Skip to main content

गांधी ,बाबासाहेबांना एकदा म्हणाले

गांधी ,बाबासाहेबांना एकदा म्हणाले
होते....,
मी हरीजन समाजाला रोटी कपडा मकान देवू शकतो. तुम्ही सुट बुट घालून या समाजात कसा बदल घडवणार ?
तेव्हा बाबासाहेब म्हणाले, मिस्टर गांधी,मी सुट बुट यासाठी घालतो कारण माझा समाज माझं
अनुकरण करुन उद्या तो सुट बुटात फिरणार आहे.
.
-डॉ.बाबासाहेब आंबेडकर ...
डॉक्टर ....!
पण
कशाचे डॉक्टर .....?
बाबासाहेब एकदा भाषणामध्ये म्हणाले होते, जर का मी कॉंग्रेस बरोबर तडजोड केली असती, तर या देशाचा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू नव्हे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिले असते,
पण
बाबासाहेबांनी कधी सत्याशी आणि तत्वांशी तडजोड केली नाही.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,
डॉक्टर......
कशाचे डॉक्टर .....?
अरे,

ब्रेन वर शस्रक्रिया करणारे अनेक
डॉक्टर या इंडिया मध्ये आहेत,
काळजावर शस्रक्रिया करणारे अनेक डॉक्टर या इंडिया मध्ये आहेत,
हृदयावर शस्रक्रिया करणारे अनेक डॉक्टरया इंडिया मध्ये आहेत,
परंतु
बाबसाहेब ही डॉक्टर होते...
कशाचे डॉक्टर .....?
मेलेल्या माणसाला उठवून बसविणारे डॉक्टर.....!
मुर्द्याला जागविणारे
डॉक्टर....!
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर....!
हजारो वर्षापूर्वी, भीम जन्मण्यापूर्वी आम्ही जिवंत होतो की मेलो होतो हे आमच आम्हालाच ठाऊक नव्हतं, एखादया मुर्द्यासारखे आम्ही हिंदू दलदलीत फसलेलो होतो, तथागत गौतम बुद्धांची धम्मरूपी संजीवनी बाबासाहेबांनी या मुर्द्यांवर
शिंपडली, मुर्दे पटापट उठून बसले,
तुम्हाला आम्हाला वाचवलं...
अरे तुम्हाला आम्हाला उठवून बसवलच बसवलं, पण या देशाचं ऑंपरेशन बाबासाहेबांनी केलं.
या देशाला झालेला जातीयतेचा कॅन्सर बाबासाहेबांनी चरचर ....चरचर.....कापला.
इंडियाच ऑंपरेशन केलं,
देशाचं ऑंपरेशन केलं, आणि ३९५ कलमाच एकच इंजेक्शन दिलं, लांबच केले वळवळणारे किडे,
रोगमुक्त केलं भारताला.
असे होते डॉक्टर...
डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर...
माझ्या राजाला दगडाच्या मंदिराची गरज नाही..! माझ्या राजाला रोज
पुजाव लागत नाही..!
माझ्या राजाला दुध-तुपाचा
अभिषेक करावा लागत नाही..!
माझ्या राजाला कधी नवस बोलावा लागत नाही..! माझ्या राजाला सोने- चांदीचासाज ही चढवावा लागत नाही..!
एवढ असुनही जे जगातील
अब्जवधी लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवतात असे एकमेव युगपुरुष...!
॥ बाबासाहेब ॥
आमचे बाबा माणसातले
देव आहेत हे सिध्द करायची
गरज नाही इतिहास आहे साक्षीला...
दोन्ही हात जोडून नमस्कार घालतो
भीममुर्तीला आणि प्रणाम त्यांच्या महान किर्तीला...
!!जय भीम!!

हजारो संकटे आली तरी भिम
माझा झुकलाच नाही . उपाशी पोटी राहीला पण कधी सुकलाच नाही .
अरे, ३३ कोटी देवतांना लाजवेल
असा भिम शिकला तसा कोणी शिकलाच नाही .
म्हणून माझ्या भिमापुढे कोणी माई
का लाल कधी टिकलाच नाही ....

Comments

Popular posts from this blog

महार कोण होते?

महार कोण होते?  वेशीबाहेर राहून गावाचं रक्षण करणारा, शेती, गावांच्या सीमा सांगणारा, व्यापार्यांना संरक्षण पुरवणारा, शेतसारा आणि राज्याचा खजिना नियोजित ठिकाणी सुरक्षित पोहोचवणारा, असा समाजाचा रक्षक म्हणजे महार समाज. पण कामाच्या स्वरूपामुळं त्यांना वेशीबाहेरच ठेवण्यात आलं… महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हणजे काय हे समजावून घ्यायला पाहिजे. जे सध्या माहित आहे ते असेः 1. महार समाजाचे वास्तव्य गावकुसाबाहेर होते. 2. महार समाज ग्रामरक्षणाचे कार्य करत होता. वेशीचे रक्षण हे त्याचे नुसते कर्तव्यच नव्हे तर जबाबदारी होती. चोर नाही सापडला तर चोरीची भरपाई महारांनाच द्यावी लागत असे. 3. चोरांचा माग काढणे, गावात येणार्या जाणार्यांची नोंद ठेवणे, संशयितांना वेशीवरच अडवून ठेवणे हे त्यांचे कार्य होते. 4. शेतीच्या वा गावाच्या सीमांबाबत तंटे उद्भवले तर महाराचीच साक्ष अंतिम मानली जात असे. 5. महारांची स्वतंत्र चावडी असे आणि तिचा मान गाव-चावडीपेक्षा मोठा होता. 6. व्यापारी जेंव्हा आपले तांडे घेवून निघत तेंव्हा त्यांच्या रक्षणासाठी महारांची पथके नियुक्त असत...

२५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिन.

दि. २५ डिसेंबर १९२७ रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे सहकारी 'सहस्रबुध्दे' यांच्या हातुन विषमतावादी, जातीवादी, कर्मकांडवादी, वर्णवादी, व्यवस्थेला धरून चालणारी "मनुस्म्रूती" चे "२५/१२/१९२७" साली बाबासाहेबांनी महाड येथे मनुस्मुर्तीचे दहन केले आणि बहूजनांना जातीवादी समाजरचनेतून मुक्त केले. काही जणांना असा प्रश्न पडत असेल की, "डाॅ. बाबासाहेब आंबेडकर" यांनी "मनुस्मृती" रायगडच्या पायथ्याशीच "महाड" या ठिकाणीच का दहन केली..? देशात इतर ठिकाणी सुध्दा करता आली असती..? पण रायगडच्याच पायथ्याशीच दहन का केली..?? कारण; विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे "तथागत गौतम बुध्दांना, संत कबीरांना, छत्रपती शिवाजी महाराजांना, महात्मा फुलेंना गुरू मानायचे." छञपती शिवाजी महाराजांना शुद्र आहेत असं म्हणुन "राज्यअभिषेकाला" ब्राम्हणांनी विरोध केला होता. रायगडावर छ. शिवरायांची समाधी आहे आणि महाड हे गाव रायगडच्या पायथ्याशी आहे. म्हणजेच छ. शिवरायांच्या पायाशी मनुस्मृती जाळून ब्राम्हणांनी केलेल्या छ. शिवरायांच्या अपमानाचा ...

महाराष्‍ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारीला जयंती शिवाजी महाराज यांच्‍या विषयी रंजक माहिती. महाराजांच्‍या कन्‍येकडे इतिहासकारांचे दुर्लक्ष

महाराष्‍ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारीला जयंती शिवाजी महाराज यांच्‍या विषयी रंजक माहिती. महाराजांच्‍या कन्‍येकडे इतिहासकारांचे दुर्लक्ष संभाजी महाराज आणि राजाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे पुत्र होते, हे सर्वश्रुत आहे; परंतु महाराजांना सखुबाई, राणूबाई, अंबिका, दीपा, राजकुंवरबाई आणि कमळाबाई या सहा कन्‍याही होत्‍या याची फारशी माहिती कुणाला नाही. इतिहासकारांचेही महाराजांच्‍या कन्‍येकडे दुर्लक्ष झाल्‍याचे पाहायला मिळते. सखुबाईंचा कुणासोबत झाला विवाह ? - छत्रपती शिवाजी महाराजांची थोरल्‍या कन्या सखुबाई यांचा महादजी नाईक-निंबाळकर यांच्‍यासोबत 1655 मध्‍ये विवाह झाला होता. - त्यावेळी महादजी हे फलटणचे सरदार होते. - शिवाजींच्‍या पत्‍नी सईबाई या महादजी यांच्‍या आत्‍त्‍या होत्‍या. - फलटण हे गाव आदिलशाहीच्या राज्यात महत्त्वाचे समजले जात असल्‍याने महादजी यांना आदिलशाईतील मान होता. पतीच्‍या मृत्‍यूनंतर सखुबाई गेल्‍या सती - महादजी निंबाळकर यांना आदिलशाहने बादरा चारधारा येथे ठाणेदारी दिली होती. शिवाय त्‍यांना चार हजार जात व तीन ...