Skip to main content

धर्म बुडाला तर बुडुद्यात.. आम्हाला पोहता येतं.

धर्म बुडाला तर बुडुद्यात..
आम्हाला पोहता येतं.
.
जो धर्म चिकित्सा करू देत नाही
त्या धर्माचं पितळ उघडं आम्हाला करता येतं..
अन धर्म बुडाला तर बुडुद्यात..
आम्हाला पोहता येतं.
स्ञीच्या स्पर्शाचा ज्या देवाला विटाळ होतो
तो देवचं आमचा नाही हे ही आम्हाला नाकारता येतं..
अन धर्म बुडाला तर बुडुद्यात..
आम्हाला पोहता येतं..
वर्णवादी व्यवस्थेचा हा डौलारा किती का मजबूत असेना..
कारण त्याच्यावर ही समतेचा नांगर आम्हाला फिरवता येतं..
अन धर्म बुडाला तर बुडुद्यात..
आम्हाला पोहता येतं.
मंदिरातला देव सोन्याने नटला तरी काय फरक
जिथे शेतक-याचं सारं पिकच ओसं पडलय ... त्याच्यासाठी ही आम्हाला लढता येतं.. 
अन धर्म बुडाला तर बुडुद्यात..
आम्हाला पोहता येतं..
वेद, मनस्मृती, पुराण काय घेऊन बसलात रावं.
इथे जिवंत माणसं पेटत असतील तर ते धर्मग्रंथही आम्हाला लाथाडता येतं..
अन धर्म बुडाला तर बुडुद्यात..
आम्हाला पोहता येतं..
कधी इस्लाम खतरे मे तर कधी हिंदू खतरे मे..
धर्माच्या दंगली घडवणा-यांना ही आम्हाला ठिकाण्यावर आणता येतं..
अन धर्म बुडाला तर बुडुद्यात..
आम्हाला पोहता येतं..
महापुरुषांना त्यांच्या जातीत बंद करणा-यांना धर्मांधांनो..
हा महाराष्ट्र शिव -शाहू-फुले -आंबेडकरांचा आहे हे ही परशुरामांच्या अवलादींना आम्हाला दाखवता येतं..
अन धर्म बुडाला तर बुडुद्यात..
आम्हाला पोहता येतं..
दाभोळकर-पानसरेंनाचा इथेच दिवसा ढवळ्या खून होतो..
विचारांची लढाई विचारांशी न करणा-या नथुरामांना ही आम्हाला ठेचता येतं..
अन धर्म बुडाला तर बुडुद्यात..
आम्हाला पोहता येतं..
हजारो वर्षे बहुजनाला शिक्षणापासून वंचित ठेवून..
आरक्षणाच्या नावाने पोटसूळ उठणा-यांना ही आम्हाला नमवता येतं..
अन धर्म बुडालात तर बुडुद्यात..
आम्हाला पोहता येतं..
वास्तवापेक्षा कल्पनेचेच जास्त तारे तोडणा-यांनो
आमचे ज्वलंत प्रश्न मांडणारे कोर्ट, फँड्री, ख्वाडा सारखे राष्ट्रीय पुरस्कार चिञपट ही आम्हाला बनवता येतं..
अन धर्म बुडला तर बुडुद्यात..
आम्हाला पोहता येतं.
इतिहास घडवला आम्ही तो विकृत केलात तुम्ही ..
म्हणून काय झाल..
१८१८ च्या इतिहासाची पुनरावृत्ती ही आम्हाला करता येतं..
अन धर्म बुडाला तर बुडुद्यात..
आम्हाला पोहता येतं..
धर्म हा माणसासाठी आहे
माणूस धर्मासाठी नाही..
कोणताच धर्म हा माणसापेक्षा मोठा नाही हे ही आम्हाला सांगता येतं...
अन धर्म बुडाला तर बुडुद्यात..
आम्हाला पोहता येतं..
कारण आता भारतीय संविधानामुळे माणूस म्हणून आम्हाला जगता येतं..
अन धर्म बुडला तर बुडुद्यात..
आम्हाला पोहता येतं.

Comments

Popular posts from this blog

महार कोण होते?

महार कोण होते?  वेशीबाहेर राहून गावाचं रक्षण करणारा, शेती, गावांच्या सीमा सांगणारा, व्यापार्यांना संरक्षण पुरवणारा, शेतसारा आणि राज्याचा खजिना नियोजित ठिकाणी सुरक्षित पोहोचवणारा, असा समाजाचा रक्षक म्हणजे महार समाज. पण कामाच्या स्वरूपामुळं त्यांना वेशीबाहेरच ठेवण्यात आलं… महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हणजे काय हे समजावून घ्यायला पाहिजे. जे सध्या माहित आहे ते असेः 1. महार समाजाचे वास्तव्य गावकुसाबाहेर होते. 2. महार समाज ग्रामरक्षणाचे कार्य करत होता. वेशीचे रक्षण हे त्याचे नुसते कर्तव्यच नव्हे तर जबाबदारी होती. चोर नाही सापडला तर चोरीची भरपाई महारांनाच द्यावी लागत असे. 3. चोरांचा माग काढणे, गावात येणार्या जाणार्यांची नोंद ठेवणे, संशयितांना वेशीवरच अडवून ठेवणे हे त्यांचे कार्य होते. 4. शेतीच्या वा गावाच्या सीमांबाबत तंटे उद्भवले तर महाराचीच साक्ष अंतिम मानली जात असे. 5. महारांची स्वतंत्र चावडी असे आणि तिचा मान गाव-चावडीपेक्षा मोठा होता. 6. व्यापारी जेंव्हा आपले तांडे घेवून निघत तेंव्हा त्यांच्या रक्षणासाठी महारांची पथके नियुक्त असत...

२५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिन.

दि. २५ डिसेंबर १९२७ रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे सहकारी 'सहस्रबुध्दे' यांच्या हातुन विषमतावादी, जातीवादी, कर्मकांडवादी, वर्णवादी, व्यवस्थेला धरून चालणारी "मनुस्म्रूती" चे "२५/१२/१९२७" साली बाबासाहेबांनी महाड येथे मनुस्मुर्तीचे दहन केले आणि बहूजनांना जातीवादी समाजरचनेतून मुक्त केले. काही जणांना असा प्रश्न पडत असेल की, "डाॅ. बाबासाहेब आंबेडकर" यांनी "मनुस्मृती" रायगडच्या पायथ्याशीच "महाड" या ठिकाणीच का दहन केली..? देशात इतर ठिकाणी सुध्दा करता आली असती..? पण रायगडच्याच पायथ्याशीच दहन का केली..?? कारण; विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे "तथागत गौतम बुध्दांना, संत कबीरांना, छत्रपती शिवाजी महाराजांना, महात्मा फुलेंना गुरू मानायचे." छञपती शिवाजी महाराजांना शुद्र आहेत असं म्हणुन "राज्यअभिषेकाला" ब्राम्हणांनी विरोध केला होता. रायगडावर छ. शिवरायांची समाधी आहे आणि महाड हे गाव रायगडच्या पायथ्याशी आहे. म्हणजेच छ. शिवरायांच्या पायाशी मनुस्मृती जाळून ब्राम्हणांनी केलेल्या छ. शिवरायांच्या अपमानाचा ...

महाराष्‍ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारीला जयंती शिवाजी महाराज यांच्‍या विषयी रंजक माहिती. महाराजांच्‍या कन्‍येकडे इतिहासकारांचे दुर्लक्ष

महाराष्‍ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारीला जयंती शिवाजी महाराज यांच्‍या विषयी रंजक माहिती. महाराजांच्‍या कन्‍येकडे इतिहासकारांचे दुर्लक्ष संभाजी महाराज आणि राजाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे पुत्र होते, हे सर्वश्रुत आहे; परंतु महाराजांना सखुबाई, राणूबाई, अंबिका, दीपा, राजकुंवरबाई आणि कमळाबाई या सहा कन्‍याही होत्‍या याची फारशी माहिती कुणाला नाही. इतिहासकारांचेही महाराजांच्‍या कन्‍येकडे दुर्लक्ष झाल्‍याचे पाहायला मिळते. सखुबाईंचा कुणासोबत झाला विवाह ? - छत्रपती शिवाजी महाराजांची थोरल्‍या कन्या सखुबाई यांचा महादजी नाईक-निंबाळकर यांच्‍यासोबत 1655 मध्‍ये विवाह झाला होता. - त्यावेळी महादजी हे फलटणचे सरदार होते. - शिवाजींच्‍या पत्‍नी सईबाई या महादजी यांच्‍या आत्‍त्‍या होत्‍या. - फलटण हे गाव आदिलशाहीच्या राज्यात महत्त्वाचे समजले जात असल्‍याने महादजी यांना आदिलशाईतील मान होता. पतीच्‍या मृत्‍यूनंतर सखुबाई गेल्‍या सती - महादजी निंबाळकर यांना आदिलशाहने बादरा चारधारा येथे ठाणेदारी दिली होती. शिवाय त्‍यांना चार हजार जात व तीन ...